'PM पीएम कुसुम योजने' मध्ये महाराष्ट्र अव्वल ! सौरपंप योजनेचा जवळ्पास ७२ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ
PM KUSUM Scheme : ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर स्वरूपाची असल्याने शेती पूरक व्यवसायाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ह्या अडचणी शेतकऱ्याला येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शेतकऱ्याला सोपे व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी वीज पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी 'पीएम कुसुम योजना' राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर असून आजपर्यंत साधारणतः ७२ हजार शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतला आहे.
...
![]() दुचाकीच्या किमतीत आता खरेदी करा इलेक्ट्रिक कार Electric carयेथे क्लिक करा/Click Here |
केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय द्वारे 'किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान' म्हणजेच 'कुसुम' ही योजना २०११ ते २०२३ या कालावधीसाठी राबवत आहे. या योजनेत राज्यांना ९ लक्ष ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. देशात यापैकी जवळपास २ लाख ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप महाराष्ट्रामध्ये महाऊर्जा मार्फत बसविण्यात आले आहेत.
पीएम PM कुसुम योजनेच्या अमलबजावणीसाठी महाऊर्जा मार्फत स्वतंत्र पोर्टल बनवण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, छाननी करणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरण्याची सुविधा देणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, पुरवठादार कतनिवडण्याचे शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुरवठादार निवडल्या नंतर सौर पंप स्थापित करून त्याची आरएमएस RMS या प्रणालीद्वारे माहिती घेतली जाते व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रातील महाऊर्जास २ लक्ष २५ हजार सौर पंप आस्थापनेस मान्यता दिली आहे. यापैकी राज्य शासनाने महावितरण कंपनीस त्यांच्याकडील paid Pending च्या पुढील १ लाख सौर पंप आस्थापनेसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंप देण्यात येणार आहे.
महाऊर्जाकडे उर्वरित १ लाख २५ हजार सौर पंपाचे उद्दिष्टास अनुसरून राज्यातील शेतकऱ्यांकडून साधारणतः ८ लाख ७४ हजार ९७ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी साधारणतः १ लाख ४ हजार ८२३ जणांना मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी ९४ हजार ९१९ जणांना 'एसएमएस' SMS पाठविण्यात आले आहेत.
८३ हजार ४८० शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला असून त्यापैकी साधारणतः ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित झाले आहेत. त्यामुळे महाऊर्जा कंपनीने ११ सप्टेंबरला केंद्र शासनाकडे पुढील एक लाख ८० हजार सौरपंपांच्या अधिक उद्दिष्टाची मागणी सुद्धा केली आहे.
कृषी सौरपंपांसाठी ९० टक्के अनुदान....
कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ९० % टक्के अनुदान देण्यात येत असून यात सर्वसाधारण घटकासाठी केंद्र ३०% टक्के, राज्य १०% टक्के, लाभार्थी १०% टक्के तर टोसे ५०% टक्के हिस्सा आहे. तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लाभार्थी हिस्सा ५% टक्के आहे, केंद्र ३०% टक्के तर राज्य ६५% टक्के हिस्सा देईल.
राज्यनिहाय कुसुम योजनेची सद्यःस्थिती
राज्य एकूण मंजूर स्थापित सौर पंप
महाराष्ट्र २,२५,००० ७१,९५८
उत्तरप्रदेश ६६, ८४२३१, ७५२
राजस्थान १,९८,८८४ ५९,७३२
हरियाना २,५२,६५५ ६४,९१९